Blogभाजीपाला

Palak lagvad in marathi

Palak lagvad in marathi

Palak lagvad in marathi : पालक हे मूळ मध्य आणि पश्चिम आशियामधील पीक आहे.पालक हे बारमाही भाजी असून जगभरात त्याची लागवड मोठ्या प्रमाणावर केली जाते. पालकमध्ये लोह, जीवनसत्व आणि अँटिऑक्सिडंट चांगल्या प्रमाणामध्ये असतात. पालकाचे अनेक आरोग्यदायी फायदे आहेत, पालकाचा समावेश आहारामध्ये केल्यामुळे रोगप्रतिकारक शक्ती वाढण्यासाठी मदत होते. पचनासाठी पालक चांगले असते पालक खाल्ल्यामुळे त्वचा, केस, डोळे आणि मेंदू यांचे आरोग्य चांगले राहते.

कर्क रोग विरोधी आणि वृद्धतत्त्व विरोधी गुणधर्म असून आंध्र प्रदेश, तेलंगणा, केरळ, तामिळनाडू, उत्तर प्रदेश, महाराष्ट्र, पश्चिम बंगाल, कर्नाटक आणि गुजरात या सर्व राज्यांमध्ये पालकाची लागवड मोठ्या प्रमाणावर केली जाते. पालकमध्ये विटामिन चे प्रमाण देखील चांगले आहेत. कॅल्शियम हाडांच्या आरोग्यासाठी महत्त्वपूर्ण आहे. पालक मधील नायट्रेट्स नायट्रिक ऑक्साईड मध्ये रूपांतर होतात ज्यामुळे रक्तवाहिन्या शिथिल होतात आणि रक्त प्रवाह सुधारतो.

ज्यामुळे हृदयविकार आणि स्ट्रोकचा धोका देखील कमी होतो. पालक खाल्ल्यामुळे शरीराला कमी कॅलरीज मिळतात पण फायबर चांगल्या प्रमाणामध्ये मिळते त्यामुळे पोट बराच काळ भरल्यासारखे वाटते आणि वजन कमी करण्यासाठी देखील या गोष्टीचा उपयोग होतो रोजच्या आहारामध्ये पालकाचा समावेश केल्यावर वजन आपोआप कमी होण्यासाठी मदत होते पालकमध्ये कॅरोटीनाईट्स न्यूटन आणि जॅक्शन तीन ही तत्वे असतात त्यामुळे मोतीबिंदू सारख्या शारीरिक त्रासापासून शरीराला वाचवते.

पालकमध्ये अल्फालिपॅक ऍसिड नावाचे अँटिऑक्सिडंट असतात त्यामुळे रक्तामधील साखरेची पातळी कमी होते आणि मधुमेहासारख्या रोग होण्यापासून शरीराला वाचवते. हिवाळ्यामध्ये पालक आल्यामुळे इम्युनिटी बूस्ट होते. पालक खाल्ल्यामुळे शरीर हायड्रेटेड राहते त्यामुळे पचन चांगले होते आणि बद्धकोष्ठता सारख्या गोष्टींपासून शरीराला आराम मिळतो पालक चा रस पिल्यामुळे डोळ्यांचे आणि केसांचे आरोग्य चांगले राहते.

लागणारी जमीन :

  • पालक लागवड करण्यासाठी पाण्याचा उत्तम निचरा होणारी जमीन निवडावी.
  • ज्या जमिनीमध्ये पाणी साचून राहते अशा जमिनीमध्ये लागवड केल्यानंतर उत्पन्न चांगले येत नाही.
  • पालकची लागवड बऱ्यापैकी सर्व जमिनीमध्ये करता येते.
  • परंतु वालुकामय, चिकन माती आणि गाळाच्या जमिनीवर उत्पन्न घेतल्यावर चांगले येते.
  • पालक लागवडीसाठी जास्त प्रमाणामध्ये आम्लयुक्त असलेल्या जमिनी टाळाव्या.
  • पालक लागवड करण्यासाठी जमिनीचा सामू 6 ते 7 दरम्यान असल्यास उत्पन्न चांगले मिळते.
  • ज्या जमिनीमध्ये सेंद्रिय पदार्थाचे प्रमाण जास्त असते, अशा जमिनीमध्ये लागवड केल्यानंतर उत्तम रित्या पालकाचे पीक येते.

लागणारे हवामान :

  • पालक हे हिवाळ्यामध्ये येणारे पीक असून पालकासाठी 15 ते 30 अंश सेल्सिअस तापमान योग्य ठरते.
  • पालक हे पीक अत्यंत कमी कालावधीमध्ये येते आपल्याकडे कडक उन्हाळ्याचे दोन महिने सोडले तर सर्व महिन्यांमध्ये पालक लागवड आपण करू शकतो.
  • तापमानामध्ये जास्त प्रमाणात वाढ झाल्यानंतर पालक चांगल्या प्रतीचे उगवत नाही.
  • पालक या पिकाला सरासरी 80 ते 120 सेंटीमीटर पाऊस योग्य ठरतो.

सुधारीत जाती :

1.पंजाब ग्रीन :

या जातीची पालक गडद चमकदार पाने असलेली अर्धी ताट असते. लागवड केल्यानंतर तीस दिवसानंतर पहिली काढणी सुरू होते. या जातीच्या पालकमध्ये ऑक्साइलिक ऍसिडचे प्रमाण कमी असते आणि या जातीपासून 125 क्विंटल एकरी उत्पादन मिळते.

2.पंजाब निवड :

या जातीच्या पालकचा रंग हलका हिरवा असून पालक पातळ लांब आणि अरुंद असतो. या जातीच्या पालकला हल्की आंबट चव असते. पालकाच्या देठावर जांभळ्या रंगाचा ठिपके दिसतात. या जातीपासून सरासरी 115 क्विंटल पर्यंत एकरी उत्पादन मिळते.

3.देशी पालक :

या जातीची लागवड बहुतांश प्रमाणामध्ये शेतकरी करतात. देशी पालक साठी बाजारामध्ये मोठी मागणी असते. त्याचबरोबर या पालकला चांगला दर देखील मिळतो. देशी पालकची पाने गुळगुळीत आणि लहान असतात आणि पीक लवकर तयार होते.

4.ऑल ग्रीन :

या जातीच्या पालकाची लागवड केल्यानंतर 6 ते 7 वेळा पाने कापता येतात. या जातीचे उत्पन्न जास्त प्रमाणामध्ये मिळते. हिवाळ्यामध्ये या जातीची लागवड केल्यानंतर पीक तयार व्हायला 70 दिवस लागतात.

5.जॉबनर ग्रीन :

या जातीची पालक हलकी हिरवी असून पाने कोमल असतात. लागवड केल्यानंतर पाच ते सहा वेळा आपण पालकाची तोडणी करू शकतो. या जातीपासून चांगले उत्पन्न शेतकऱ्याला मिळते.

6.एस 23 :

या जातीची लागवड केल्यानंतर सरासरी 30 दिवसांमध्ये पीक काढण्यासाठी तयार होते. या जातीची पाने गडद हिरवी रुंद असतात.

लागवड :

  • लागवड करण्यासाठी निवडलेली जमीन दोन ते तीन वेळा चांगली नांगरून घ्यावी.
  • नांगरट नंतर कोळपणी करावी.
  • कोळपणीच्या शेवटच्या पाळीच्या अगोदर जमिनीमध्ये चांगले कुजलेले शेणखत घालून घ्यावे.
  • त्यानंतर जमीन सपाट करावी आणि पालक लागवडीसाठी बेड तयार करून घ्यावे.
  • पालकाची पेरणी वर्षभर केली जाऊ शकते.
  • हिवाळ्याच्या हंगामासाठी सर्वोत्तम वेळ ही सप्टेंबर ते ऑक्टोबर मध्ये असते.
  • वसंत ऋतु साठी मध्य फेब्रुवारी ते एप्रिल पर्यंत असते.
  • पालकाची लागवड करत असताना 25 ते 30 सेंटिमीटर अंतर ओळींमध्ये ठेवावे, त्यामुळे पीक उत्तम रित्या येते आणि रोपांमधील अंतर पाच ते दहा सेंटिमीटर पर्यंत ठेवावे.
  • पालकांच्या बियाण्यांची पेरणी करत असताना खोली 3 ते 4सेंटीमीटर एवढेच ठेवावी.
  • पालकाची पेरणी ओळ पेरणी किंवा प्रसारण पेरणी या पद्धतीने केली जाते.

खत आणि पाणी व्यवस्थापन :

  • जमीन तयार करत असताना जमिनीमध्ये चांगले कुजलेले शेणखत घालून घ्यावे.
  • त्यानंतर जमिनीला जीवामृत देखील सोडावे.
  • त्यामुळे जमिनीमधील सेंद्रिय कर्ब वाढतो आणि जमीन देखील सुपीक बनते.
  • बियाण्यांची उगवण आणि चांगल्या वाढीसाठी जमिनीमध्ये ओलावा असणे गरजेचे असते.
  • पेरणीच्या वेळी जमिनीमध्ये योग्य ओलावा नसल्यास पेरणीपूर्वी पाणी द्यावे.
  • पेरणी नंतर पहिली पाणी द्यावे.
  • उन्हाळ्याच्या महिन्यांमध्ये चार ते सहा दिवसाच्या अंतरावर पाणी द्यावे आणि हिवाळ्यामध्ये दहा ते बारा दिवसाच्या अंतराने पाणी द्यावे.
  • पाणी देत असताना जास्त पाणी साचून राहणार नाही याची काळजी घ्यावी.
  • कारण जास्त पाणी साचून राहिल्यामुळे रोगांचा प्रादुर्भाव मोठ्या पानावर दिसून येतो आणि पालकाची गुणवत्ता देखील बिघडते.
  • पालक लागवडीसाठी ठिबक सिंचन चा वापर केल्यावर फायदेशीर ठरते.

आंतर मशागत :

  • पालकचे चांगले उत्पन्न घेण्यासाठी शेतामध्ये तणांचे नियोजन करणे खूप गरजेचे असते.
  • पेरणीनंतर पहिले दोन आठवडे तणांचा प्रादुर्भाव होऊ देऊ नये.
  • त्यासाठी दोन ते तीन खुरपण्या केल्या जातात. शेताला तण विरहित ठेवावे.
  • पाण्यासाठी ठिबक सिंचनाचा वापर करावा.
  • त्यामुळे तणांचा प्रादुर्भाव कमी होतो आणि खुरपणी केल्यामुळे जमीन देखील भुसभुशीत राहते.
  • त्यामुळे पिकाचे उत्पन्न चांगले येते.
  • खुरपणी आणि हलक्या कोळपणी केल्यामुळे पालकला देखील मातीची भर लागते त्यामुळे उत्पन्न चांगले येते.

कीड व रोग नियंत्रण :

1.मावा :

मावा ही रस शोषक कीड असून या किडीचा प्रादुर्भाव झाल्यानंतर पाने कुर्वळतात आणि पिवळी पडतात. कारण ही कीड पालक मधून मोठ्या प्रमाणावर अन्न रस शोषते. त्यामुळे झाड कमकुवत बनते. मावा ही कीड स्वतःच्या शरीरामधून एक चिकट गोड पदार्थ स्त्रवते. त्या पदार्थावर काळी बुरशी आकर्षित होते. त्यामुळे संपूर्ण पाने काळी पडतात आणि प्रकाश संश्लेषण ची क्रिया मंदावते. याचा अनिष्ट परिणाम पिकाच्या वाढीवर होतो आणि उत्पादनामध्ये घट होते. या किडीचा प्रादुर्भाव झाल्यानंतर जैविक कीटकनाशकांची फवारणी घ्यावी. शेतामध्ये चिकट सापळ्यांचा वापर करावा एकरी दहा ते बारा चिकट सापळे लावावे.

2. तंबाखू सुरवंट :

या किडीचा प्रादुर्भाव झाल्यानंतर पाण्यामध्ये छिद्रे दिसून येतात. पाने कागदी दिसतात, ही कीड मोठ्या प्रमाणावर पालकचे नुकसान करते. या किडीवर नियंत्रण करण्यासाठी जैविक कीटकनाशकांची फवारणी घ्यावी. 3. लिफ मायनर : ही कीड पानांच्या आत राहून हल्ला करते. पानांवर लहान पांढरे बोगदे पाडते. त्यामुळे पानांवर पांढऱ्या रंगाच्या रेषा दिसतात. जास्त प्रमाणावर प्रादुर्भाव झाल्यावर पाने गळतात. या किडीचा प्रादुर्भाव थांबवण्यासाठी जैविक कीटकनाशकांची फवारणी करावी.

रोग :

1. डाऊनी मिल्ड्यू :

या रोगाचा प्रादुर्भाव झाल्यानंतर पानांच्या खालच्या बाजूला पांढरी पावडर आणि वरच्या बाजूला पिवळे ठिपके पडतात. पाने पूर्णपणे सुकून जातात. जास्त प्रमाणामध्ये प्रादुर्भाव झाल्यानंतर पाने गळतात आणि उत्पादनावर याचा अनिष्ट परिणाम होतो. या रोगाचा प्रादुर्भाव झाल्यानंतर जैविक बुरशीनाशकांची फवारणी करावी.

2. लिफ स्पॉट :

या रोगाचा प्रादुर्भाव झाल्यानंतर पानांवर तपकिरी डाग पडतात आणि पाने अकाली सुकतात. जास्त प्रमाणावर प्रादुर्भाव वाढल्यानंतर हळूहळू सर्व भागांवर तपकिरी डाग पडतात. यामुळे पिकाची गुणवत्ता ढासळते. बाजारामध्ये चांगला भाव मिळत नाही.या रोगाचा प्रादुर्भाव थांबण्यासाठी जैविक बुरशीनाशकांची फवारणी करावी.

3.ओलसर बंद आणि रूट रोट :

या रोगाचा प्रादुर्भाव झाल्यानंतर बिया उगवत नाहीत. रोप कुजतात, मुळे कुजतात, कोवळी पाने पिवळी पडतात. देठांवर डाग पडतात. या रोगाचा प्रादुर्भाव झाल्यानंतर जैविक बुरशीनाशकांची फवारणी करावी.

पालकाची काढणी :

  • पालक लागवड केल्यानंतर सरासरी एका महिन्यांमध्ये कापणीला तयार होते.
  • कापणी करत असताना खराब पालक वेगळी काढली जाते.
  • पालकाची व्यवस्थित जुडी बांधून घ्यावी.
  • जुड्या व्यवस्थित जागेवर ठेऊन त्यावर कापड झाकून किंवा बांबूचे टोपली मध्ये ठेवावी.
  • टोपलीच्या खाली किंवा वर कडुनिंबाचा पाला ठेवला तर पालक लवकर खराब होत नाही.
  • पालकाच्या जुड्यावर जास्त प्रमाणामध्ये पाणी मारणे टाळावे अन्यथा पालक पूर्णपणे खराब होते.
  • पालकाचे उत्पन्न निवडलेली जमीन, असणारे हवामान, निवडलेल्या जाती, खत आणि पाणी व्यवस्थापन, अंतर मशागत, किडी आणि रोगांच्या प्रादुर्भाव यांवर अवलंबून असते.
  • पालकापासून शेतकऱ्याला हेक्टरी 10 ते 15 टन पर्यंत उत्पन्न मिळते.
  • तसेच बियांचे उत्पादन घेतल्यानंतर 1.5 टन पर्यंत बिया मिळतात.

Follow This Page : https://www.facebook.com/naturekrushi

https://naturekrushi.com/category/vegetables

5/5 - (3 votes)

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *